Snake in Women's Coach?:महिला डब्यात साप? चेन पुलिंगमुळे लोकलचा खोळंबा, कुर्ला स्थानकामध्ये प्राणिमित्रांकडून तपासणी

ठाणे स्थानकावर शुक्रवारी सकाळी अप दिशेकडे जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात साप असल्याची अफवा पसरल्यानंतर घाबरलेल्या महिला प्रवाशांनी चेन पुलिंग (एसीपी) केले. यामु
ठाणे स्थानकावर शुक्रवारी सकाळी अप दिशेकडे जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात साप असल्याची अफवा पसरल्यानंतर घाबरलेल्या महिला प्रवाशांनी चेन पुलिंग (एसीपी) केले. यामुळे लोकल तब्बल १२ मिनिटे ठाणे स्थानकात खोळंबली. या घटनेमुळे नाहूर आणि कुर्ला स्थानकांवरही लोकल थांबवून सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, कुठेही साप आढळून आला नाही. या प्रकारामुळे अप स्लो मार्गावरील काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९:१४ वाजता ठाणे स्थानकाच्या प्लॅट क्रमांक ४ वरून सुटलेली अप दिशेची लोकलच्या महिला डब्यात साप असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने थांबवण्यात आली. प्रवाशांनी चेन पुलिंग केल्यामुळे ही लोकल सकाळी ९:१४ ते ९:२६ या कालावधीत, म्हणजेच १२ मिनिटे ठाणे स्थानकात उभी होती. त्यानंतर लोकल पुढे रवाना करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणेनंतर नाहूर स्थानकात लोकल चार मिनिटे थांबवून पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यानंतर कुर्ला स्थानकातही लोकल १४ मिनिटे थांबवण्यात आली. प्राणिमित्रांच्या मदतीने महिला डब्यासह संपूर्ण लोकलची तपासणी करण्यात आली. साप किंवा अन्य कोणताही प्राणी आढळून आला नाही. त्यामुळे साप असल्याची माहिती ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे अप स्लो मार्गावरील डीएल-१२, पीटीएल-२, के-३६, टीएल-१८, डीएल-१४ आणि के-४० या लोकल उशिराने धावल्या. सकाळी गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु रेल्वे प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने नेहमीच तत्परता दाखवली आहे आणि या घटनेनंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कार्यक्षमतेची प्रचिती दिली. रेल्वे प्रवास करताना अशा प्रकारच्या अफवांमुळे प्रवाशांच्या मनात भीती निर्माण होते, त्यामुळे प्रवाशांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षितता आणि सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांनी काळजी न करता प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.





















