Intensified Protests in Dharavi: धारावी पुनर्विकासाविरोधातील आंदोलन तीव्र; १५ ऑगस्टला मुलुंड, कुर्ला दूध डेअरी आणि धारावीत तिरंगा रॅली

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. धारावीकरांनी ५०० चौ. फुटांचे घर देण्याची मागणी केली आहे, तर मुलुंड आण
मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. धारावीकरांनी ५०० चौ. फुटांचे घर देण्याची मागणी केली आहे, तर मुलुंड आणि कुर्ला दूध डेअरीच्या जागेवरील पुनर्वसन रद्द करण्याचीही मागणी केली आहे. या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने धारावीकर, मुलुंड व कुर्लावासी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच १५ ऑगस्टला धारावी, मुलुंड पूर्व आणि कुर्ला दूध डेअरी येथे तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. यानंतर १० दिवसांनी एकत्रित आंदोलनाचे आयोजन केले जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून झोपडपट्टीवासीयांना ३५० चौ. फुटांचे घर देण्यात येणार आहे, परंतु धारावीकरांचा यावर तीव्र विरोध आहे. त्यांनी ५०० चौ. फुटांचे घर देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन धारावीतच करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. धारावी बचाव आंदोलनाने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पात मुलुंड पूर्व येथील मिठागराची ४२.५१ एकर जागा धारावीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. याशिवाय, मुलुंड कचराभूमीच्या १५ एकर जागेवरही धारावीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. परंतु, धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. यामुळे मुलुंडवासीयांनी आंदोलन सुरू केले आहे आणि न्यायालयातही लढाई सुरू आहे. कुर्ला मदर डेअरीच्या जागेवरही धारावीसाठी देण्यास कुर्लावासीयांचा विरोध आहे. या सर्व परिस्थितीत राज्य सरकार रहिवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने धारावीकर, मुलुंडवासी आणि कुर्लावासी आक्रमक झाले आहेत. यामुळे या प्रकल्पावरून असंतोष वाढत आहे आणि स्थानिक नागरिक एकत्र येऊन आवाज उठवत आहेत.





















