Weather Alert: महाराष्ट्रासह १५ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भाग पाण्याखाली गेले आहेत आणि त्यामुळे जनज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भाग पाण्याखाली गेले आहेत आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रासह १५ राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. याशिवाय, काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ऑगस्ट महिन्यात रात्री ८ ते ६ ऑगस्टच्या कालावधीत पूर्व उपनगरांमध्ये सरासरी ११.९५ मिमी, पूर्व उपनगरात ११.८४ मिमी, तर पश्चिम उपनगरात १२.६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.



















