Salman Khan's Initiative: आसाममधील पुरग्रस्तांसाठी ५०० घरं उभारणार भाईजान

सलमान खान हा एक असा अभिनेता आहे जो केवळ चित्रपटांमध्येच नाही तर सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. आसाममध्ये आलेल्या भयंकर पुरामुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झा
सलमान खान हा एक असा अभिनेता आहे जो केवळ चित्रपटांमध्येच नाही तर सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. आसाममध्ये आलेल्या भयंकर पुरामुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या कठीण काळात, सलमान खानने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्याने आसाममधील पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये शिवसागर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना अन्नपदार्थांचे पॅकेट्स वितरित करण्यात आले आहेत. आता सलमान खानने या मदतीच्या दुसऱ्या टप्प्यात सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या Being Human फाउंडेशन आणि सलमान खान फॅन क्लबच्या सहकार्याने ही मदत कार्य सुरू आहे. या उपक्रमात नागरिकांच्या पुनर्वसनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आसाममधील संकटग्रस्त कुटुंबांना सुरक्षित घरं बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे नाव आहे 'आशियाना होप बिगिनर्स विथ अ शेल्टर'. या अंतर्गत, नेपाळी खुटी गावात आतापर्यंत २२० घरं बांधण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे अनेक बेघर कुटुंबांना नव्या जीवनाची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. सलमान खानच्या या उपक्रमामुळे अंदाजे ५०० घरं बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे पुरग्रस्तांना सुरक्षित वातावरण मिळेल आणि त्यांना आत्मविश्वासाने नव्याने उभं राहण्यास मदत होईल. सलमान खानच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला रिअल लाईफ हिरो म्हणून संबोधले जात आहे.



















